स्पर्धाAI

MPSC गट ब २०२०

ASO Paper II · ९६ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Logical Reasoning

सफल आणि दियाने गुप्तपणे संदेश लेखनासाठी संकेतप्रणाली तयार केली आहे. ती प्रणाली पुढील नियमांवर आधारित आहे. (a) A ते M पर्यंतच्या प्रत्येक अक्षराऐवजी N ते Z पर्यंतची समक्रम अक्षरे ठेवायची. याप्रमाणे A ऐवजी N, B ऐवजी O इत्यादी आणि N ते Z अक्षराऐवजी A ते M अक्षरे उलट्या क्रमाने मांडून समक्रम अक्षरे ठेवायची. याप्रमाणे N ऐवजी M, Z ऐवजी A याप्रमाणे. (b) प्रक्रिया 1 मधून मिळालेल्या प्रत्येक अक्षराऐवजी वर्णाक्षरे उलट्या क्रमाने मांडून त्या प्रत्येक अक्षराचा दोन अंकी क्रम तेथे ठेवायचा. म्हणजे A होईल 26, B होईल 25, X होईल 03, याप्रमाणे. या प्रणालीनुसार INVESTOR या शब्दाचा संकेत निवडा.

  • )0514220919201518✓ योग्य
  • )0514210919211518
  • )0513220919201519
  • )0514211019201318

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

जर A+B चा अर्थ A ही B ची आई आहे; A–B चा अर्थ A ही B ची बहीण आहे; A×B चा अर्थ A हे B चे वडील आहेत आणि A÷B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे तर N हा M चा मामा आहे या अर्थाचे विधान निवडा.

  • )N÷P–L+E–M✓ योग्य
  • )M–Y×P–N+E
  • )N–Y+A÷M+E
  • )N÷C+F×M–L

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

प्रत्येक मोठी कोंबडी दर दिवशी सारख्या प्रमाणात अन्न खाते आणि लहान कोंबड्यांबाबतही असेच आहे. एक मोठी आणि दोन लहान कोंबड्या एक दिवसात कुक्कुट अन्नाच्या 100 गुटिका खातात. दोन मोठ्या आणि तीन लहान कोंबड्यांना खाण्यासाठी 175 अन्न गुटिका लागतात. या माहितीच्या आधारे दिलेल्या पर्यायातून चुकीचे विधान निवडा.

  • )लहान कोंबडीला 24 तासांपेक्षा थोडा जास्त काळासाठी खाद्य द्यायला 30 अन्न गुटिका पुरेशा आहेत.
  • )तीन मोठ्या व दहा लहान कोंबड्यांना प्रत्येक दिवशी खाद्य देण्यासाठी 450 अन्न गुटिका लागतील.✓ योग्य
  • )मोठ्या कोंबडीला दिवसभराचे खाद्य म्हणून 65 अन्न गुटिका पुरेशा आहेत.
  • )लहान कोंबडीशी तुलना केल्यास मोठी कोंबडी दुप्पटीने अन्न खाते.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या आईच्या आजच्या वयाच्या 2/5 इतके आहे. 8 वर्षांनंतर ते त्याच्या आईच्या त्यावेळेच्या वयाच्या 1/2 इतके असेल तर त्याच्या आईचे आजचे वय किती ?

  • )70
  • )60
  • )40✓ योग्य
  • )62

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

वैध निष्कर्ष निवडा. सत्य विधाने : काही रांगा प्राणी आहेत. काही प्राणी कुस्तीगीर आहेत. सर्व कुस्तीगीर कविता आहेत. निष्कर्ष : (a) काही कुस्तीगीर प्राणी आहेत. (b) काही कविता रांगा आहेत. (c) सर्व रांगा कविता आहेत. (d) काही कविता प्राणी आहेत. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) व (b) / Only (a) and (b)
  • )फक्त (a) व (d) / Only (a) and (d)✓ योग्य
  • )फक्त (a) व (c) / Only (a) and (c)
  • )फक्त (b) व (c) / Only (b) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

नऊ क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी काय असेल ?

  • )109
  • )112
  • )110✓ योग्य
  • )107

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

विश्व जे काम 8 दिवसात करतो तेच काम करायला सृष्टीला 10 दिवस लागतात. जर दोघे मिळून ते काम करत असतील तर ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल ?

  • )10 1/2 दिवस
  • )6 1/2 दिवस
  • )4/9 दिवस
  • )4 4/9 दिवस✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

एका मार्च महिन्यातील शेवटचा रविवार कोणत्या वारी आला आहे या प्रश्नसंदर्भात दिलेल्या विदेचा पुरेसेपणा निश्चित करा. बिदा विधाने : (a) शुक्रवार हा त्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. (b) त्या महिन्याच्या पहिल्या रविवारी 5 तारीख आहे. पर्यायी उत्तरे : (1) (a) व (b) दोन्ही आवश्यक. (2) फक्त (a) पुरेशी नाही. (3) फक्त (a) किंवा (b) पुरेशी आहे. (4) फक्त (b) पुरेशी नाही.

  • )(a) व (b) दोन्ही आवश्यक.
  • )फक्त (a) पुरेशी नाही.
  • )फक्त (a) किंवा (b) पुरेशी आहे.✓ योग्य
  • )फक्त (b) पुरेशी नाही.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

एका प्राणी गटात बाल व प्रौढ माद्या आहेत. नवजात मादी एका महिन्यात प्रौढत्व प्राप्त करते आणि जर परिस्थिती अनुकूल असेल तर पाच वर्षांपर्यंत दर महिन्याला सरासरी एका नवजात मादीला जन्म देते. जर एका गटात सुरुवातीला एक नवजात मादी असेल तर दहा महिन्यांनंतर लगेचच त्यात किती माद्या असतील ?

  • )71
  • )76
  • )81
  • )89✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Logical Reasoning

आधुनिक समाजात अनेक लोक खिन्नतेने त्रस्त असतात. मेंदूच्या रासायनिक संतुलनात फेरफार करणाऱ्या काही औषधांमार्फत त्यात उतार करता येतो. तथापि सहानुभूती असणारी कुशल मानवी सोबती समस्येशी व्यक्तीची मानसिक चौकट अधिक सकारात्मक करण्याच्या हेतूने बोलतो म्हणून व्यक्ती मानसोपचार घेऊ शकते. म्हणून ज्या खिन्नमनस्क व्यक्तींना मेंदूच्या रासायनिक स्थितीत फेरफार करण्याची कल्पना आवडत नाही त्यांनी मानसोपचार निवडायला हरकत नाही. पुढील विधानातून वरील युक्तिवादाला आधारभूत गृहीतक निवडा.

  • )मानसोपचार मेंदूतील रासायनिक स्थितीत फेरफार करत नाही. / Psychotherapy does not alter the brain chemistry.✓ योग्य
  • )खिन्नमनस्कतेसाठी औषधांपेक्षा मानसोपचार अधिक प्रभावी उपचार आहे. / Psychotherapy is more effective than drugs in treating depression.
  • )मानसोपचार औषधांच्या उपचारांसोबत एकत्रित करता येत नाही. / Psychotherapy cannot be combined with drug treatments.
  • )मानवाच्या अस्तित्वालाबरोबरच खिन्नमनस्कता ही नेहमीच त्याच्यासोबत आहे. / Depression is always there with human beings when he came to existence.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Quantitative Aptitude

सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 3/5 मुली आहेत आणि यातील 1/3 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% च्या वर गुण मिळवले. जर 15 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% च्या वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.

  • )75
  • )90
  • )60
  • )30✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Logical Reasoning

एका क्रीडा मंडळात एकूण 240 खेळाडू आहेत. त्यापैकी 15 टक्के व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि क्रिकेट हे तिन्ही खेळ खेळू शकतात. या खेळांपैकी कोणतेही दोन आणि फक्त दोन खेळ खेळणारे खेळाडूही यात आहेत व त्यांची संख्या 60 आहे. फक्त व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 80 आहे. फक्त बास्केट बॉलच खेळतात किंवा फक्त क्रिकेटच खेळतात, अशा एकूण खेळाडूंची संख्या किती ?

  • )60
  • )58
  • )63
  • )64✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Logical Reasoning

एका संकेत प्रणालीनुसार, ‘poachers killed some tigers’ चा संकेत ‘sto del war vqr’ हा आहे, ‘tigers are brave creatures’ चा संकेत ‘puz war lyn mul’ हा आहे, ‘some watchmen are brave’ चा संकेत ‘sto mul lyn kig’ असा आहे आणि ‘watchmen are searching poachers’ चा संकेत ‘del agf kig lyn’ असा आहे. या संकेत प्रणालीनुसार ‘creatures killed watchman’ चा संकेत निवडा.

  • )kig, agf, del
  • )vqr, puz, kig✓ योग्य
  • )puz, del, vqr
  • )lyn, kig, agf

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Logical Reasoning

“मिताने जमनावर मात केली”, हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी दोन तथ्ये ओळखा. तथ्ये : (a) जमना व मिता या दोघींनी तानीवर मात केली, जी सर्वात शेवटी आली. (b) मिता दुसरी आली. (c) जमनाने तानीवर मात केली पण ती पहिली आली नाही. (d) मिताने शामावर मात केली.

  • )(a), (b)
  • )(a), (c)
  • )(b), (c)✓ योग्य
  • )(b), (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Quantitative Aptitude

सात ख्रिसमस भेटवस्तू आणि सात संगत खुणा केलेले एकसारखे खोके आहेत. जर भेटी यादृच्छिक रीतीने खोक्यात ठेवल्या तर नेमक्या सहा भेटी नेमक्या योग्य खुणेच्या खोक्यात जाण्याची संभाव्यता निवडा.

  • )1/6
  • )Zero✓ योग्य
  • )1/7
  • )6/7

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Geography

16. खालील विधाने पहा. (a) जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. (b) धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास दोन राज्याच्या सिमा आहेत. (c) महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 307713 चौ.कि.मी. आहे. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त विधान (a) बरोबर नाही.✓ योग्य
  • )फक्त विधान (b) बरोबर नाही.
  • )फक्त विधान (c) बरोबर नाही.
  • )विधान (a) आणि (b) बरोबर नाहीत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Geography

18. खालील विधाने पहा : (a) गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सिमा ही इंद्रावती व प्राणहिता नद्यांनी बनलेली आहे. (b) इंद्रावती नदी ही छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असून, प्राणहिता नदी ही तेलंगणा राज्याशी असलेल्या सिमेवर आहे. पर्यायी उत्तरे :

  • )(a) आणि (b) बरोबर✓ योग्य
  • )(a) बरोबर (b) चूक
  • )(a) चूक (b) बरोबर
  • )(a) आणि (b) चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Geography

19. खालील विधाने पहा : (a) प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस स्थित आहे. (b) वर्धा आणि वैनगंगा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. पर्यायी उत्तरे :

  • )विधान (a) बरोबर आहे / Statement (a) is correct
  • )विधान (b) बरोबर आहे / Statement (b) is correct
  • )विधाने (a) आणि (b) बरोबर आहेत / Statements (a) and (b) are correct✓ योग्य
  • )विधाने (a) आणि (b) बरोबर नाहीत / Statements (a) and (b) are not correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Current Affairs

20. कोणते चक्रीवादळ 17-05-2021 दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर परिणाम करून गेले ?

  • )निसर्ग / Nisarg
  • )गुलाब / Gulab
  • )तौक्ते / Tauktae✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Maharashtra

21. जोड्या जुळवा : जिल्हा (a) गडचिरोली (b) चंद्रपूर (c) गोंदिया (d) भंडारा तालुका (i) जिवती (ii) देवरी (iii) मुलचेरा (iv) लाखणी पर्यायी उत्तरे :

  • )(a) (b) (c) (d) (ii) (iii) (iv) (i)
  • )(iii) (i) (ii) (iv)✓ योग्य
  • )(iv) (iii) (ii) (i)
  • )(ii) (iv) (iii) (i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Maharashtra

22. जोड्या जुळवा : प्रशासकीय विभाग (a) अमरावती (b) नागपूर (c) औरंगाबाद (d) कोकण तालुका (i) खालापूर (ii) संगणव (iii) भिवापूर (iv) घाटंजी

  • )(iv) (iii) (ii) (i)✓ योग्य
  • )(i) (ii) (iii) (iv)
  • )(iii) (i) (ii) (iv)
  • )(iv) (ii) (iii) (i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Economy

राज्यात ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी कोणती योजना आली व ती कधी सुरु झाली ?

  • )डॉ. मुखर्जी निवारा योजना – 2014
  • )इंदिरा आवास योजना – 1989✓ योग्य
  • )जवाहर आवास योजना – 1995
  • )रोजगार हमी योजना – 2011

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Geography

महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम बरोबर आहे?

  • )कुंभार्ली, आंबा, आंबोली, फोंडा
  • )कुंभार्ली, आंबा, फोंडा, आंबोली✓ योग्य
  • )आंबा, कुंभार्ली, फोंडा, आंबोली
  • )आंबोली, फोंडा, कुंभार्ली, आंबा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Geography

खालील विधानांचा विचार करा : (a) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे पडतो. (b) आंबोलीच्या तीन बाजूंनी डोंगर व वाऱ्याच्या प्रवेशाची बाजू मोकळी आहे.

  • )दोन्ही विधाने बरोबर व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे.✓ योग्य
  • )दोन्ही विधाने चुकीची आहेत.
  • )दोन्ही विधाने बरोबर परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही.
  • )पहिले विधान बरोबर परंतु दुसरे चूक.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६History

खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा : (a) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हरिजन सेवक संघाची' स्थापना केली. (b) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या देणगीतून 'समता' हे वृत्तपत्र चालविले. (c) पहिल्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ देण्याबाबत वाद झाले. (d) "महार मांग इत्यादि लोकास विद्या शिकविण्यासाठी मंडळी" या संस्थेस दक्षिणा प्राईज फंडातून साहाय्य मिळाले.

  • )(a), (c), (d) विधाने अयोग्य आहेत
  • )(a), (b), (c) विधाने अयोग्य आहेत✓ योग्य
  • )(b), (c), (d) विधाने अयोग्य आहेत
  • )(c), (d) विधाने अयोग्य आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७History

25 सप्टेंबर 1916 रोजी मद्रास येथे डॉ. ॲनी बेझंट यांनी कोणत्या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली ?

  • )होमरूल लीग✓ योग्य
  • )कॉमन वील
  • )हिंदू महासभा
  • )स्वराज्य संघ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९History

निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी एकमेकांच्या भाषा व चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी ‘आंतर भारती’ ही कल्पना ______ यांनी मांडली.

  • )डॉ. मुंजे
  • )डॉ. हेडगेवार
  • )लोकमान्य टिळक
  • )साने गुरुजी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०History

1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पद ______ यांनी भूषवले.

  • )दादाभाई नौरोजी
  • )म.गो. रानडे
  • )मोरोपंत जोशी
  • )बद्रुद्दीन तय्यबजी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१History

शेतकरी व कारागीर हेच देशाचे खांब आहेत, पण त्यांची दुर्दशा झाली आहे, अशी खंत कोणी व्यक्त केली आहे ?

  • )गणपत पाटील
  • )मुकुंदराव पाटील
  • )कृष्णराव भालेकर✓ योग्य
  • )यशवंतराव देशमुख

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२History

इ.स. 1910 मध्ये अलाहाबाद येथे हिंदू महासभेची स्थापना झाली. महासभेचे मुख्य कार्यालय कोठे होते ?

  • )अयोध्या
  • )हरिद्वार✓ योग्य
  • )दिल्ली
  • )रामेश्वर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३History

वृत्तपत्राविषयी कोणती विधाने योग्य आहेत ? (a) भाऊ महाजन यांनी 'प्रभाकर' नावाचे साप्ताहिक सुरु केले. (b) आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 'इंदुप्रकाश' हे वृत्तपत्र चालविले. (c) कोल्हापूर जिल्ह्यातून 'श्री शाहू' व 'शुभसूचक' ही वृत्तपत्रे सुरु झाली. (d) विष्णू बुवा ब्रह्मचारी यांनी 'वर्तमानदीपिका' या वृत्तपत्रातून आपले विचार मांडले. पर्यायी उत्तरे :

  • )(a), (b), (c) विधाने बरोबर आहेत
  • )(a), (d) विधाने बरोबर आहेत✓ योग्य
  • )(a), (c), (d) विधाने बरोबर आहेत
  • )(a), (b) विधाने बरोबर आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४History

हंटर कमिशनमुळे शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल झाले ? (a) खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले. (b) लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात आला. (c) पंजाब (1882) आणि अलाहाबाद (1887) विद्यापीठांची स्थापना झाली. (d) शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला महत्व दिले. पर्यायी उत्तरे :

  • )(b), (c), (d)
  • )(a), (b), (d)
  • )(b), (d)
  • )(a), (c), (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५History

'सर्वसाक्षी जगत्पती। त्याला नकोच मध्यस्थी।।' हे कोणत्या समाजाचे तत्व होते ?

  • )ब्राह्मो समाज
  • )आर्य समाज
  • )प्रार्थना समाज
  • )सत्यशोधक समाज✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

जोड्या लावा – (राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे) 'A' (तत्त्वे) (a) काम करण्याचा अधिकार (b) समान न्याय आणि मोफत कायदेविषयक साहाय्य (c) गो हत्या प्रतिबंध (d) समान नागरी कायदा 'B' (कलम) (i) 48 (ii) 41 (iii) 44 (iv) 39 A पर्यायी उत्तरे :

  • )(iv) (iii) (i) (ii)
  • )(i) (ii) (iii) (iv)
  • )(ii) (i) (iv) (iii)
  • )(ii) (iv) (i) (iii)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

खालील विधाने विचारात घ्या : (a) विधानसभा हे कायम स्वरूपी सभागृह आहे. (b) विधानसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. (c) विधानसभेचा सर्वसाधारण कार्यकाल 5 वर्षांचा असतो. (d) विधानसभा सदस्यासाठी वयाची 30 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. वरीलपैकी कोणती विधान/ने चुकीचे आहेत ?

  • )(a), (b)
  • )(b), (c), (d)
  • )(a), (b), (d)✓ योग्य
  • )(b), (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polity

प्रतिष्ठा आणि संधी यांच्या समानतेच्या संकल्पनेला भारतीय राज्य घटनेच्या कलम ______ ते ______ मध्ये भरीव आशय व स्वरूप प्रदान करण्यात आले आहे.

  • )25, 28
  • )23, 43
  • )36, 51
  • )14, 18✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Polity

26 नोव्हेंबर 1949 रोजी खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतूदी अंमलात आल्या ? (a) नागरिकत्वा संबंधी तरतूदी (b) निवडणुका संबंधी तरतूदी (c) तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतूदी (d) मूलभूत अधिकार पर्यायी उत्तरे : (1) (a) आणि (b) (2) (a), (c) आणि (d) (3) (a), (b) आणि (c) (4) यापैकी नाही

  • )(a) and (b)
  • )(a), (c) and (d)
  • )(a), (b) and (c)✓ योग्य
  • )None

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Polity

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे ?

  • )प्रजासत्ताक, गणराज्य, समाजवादी, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष / Democratic, Republic, Socialist, Sovereign, Secular
  • )सार्वभौम, समाजवादी, गणराज्य, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक / Sovereign, Socialist, Republic, Secular, Democratic
  • )सार्वभौम, गणराज्य, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष, समाजवादी / Sovereign, Republic, Democratic, Secular, Socialist
  • )सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य / Sovereign, Socialist, Secular, Democratic, Republic✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Polity

‘सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा’ हा विषय ______ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

  • )समवर्ती सूची / Concurrent list✓ योग्य
  • )शेषाधिकार / Residuary powers
  • )राज्यसूची / State list
  • )संघसूची / Union list

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Polity

भारतीय संविधान सभेच्या विविध समित्यांच्या योग्य जोड्या ओळखा : 'A' (समिती) (a) सल्लागार समिती (b) मूलभूत अधिकार उप-समिती (c) केंद्रीय संविधान समिती (d) अल्पसंख्याक समिती 'B' (अध्यक्ष) - जवाहरलाल नेहरू - जे.बी. कृपलानी - जवाहरलाल नेहरू - मौलाना अबुल कलाम आझाद पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a), (b), (c) / Only (a), (b), (c)
  • )फक्त (c), (d) / Only (c), (d)
  • )फक्त (b), (c), (d) / Only (b), (c), (d)
  • )फक्त (b), (c) / Only (b), (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Polity

जोड्या लावा – (घटना समितीच्या महिला सदस्या) 'A' (सदस्य) (a) सरोजिनी नायडू (b) मालती चौधरी (c) दक्षयाणी वेलायुदन (d) राजकुमारी अमृत कौर 'B' (मतदारसंघ) (i) संयुक्त प्रांत व बेरार (ii) बिहार (iii) ओरीसा (iv) मद्रास पर्यायी उत्तरे :

  • )(ii) (i) (iv) (iii)
  • )(ii) (iii) (iv) (i)✓ योग्य
  • )(iii) (ii) (i) (iv)
  • )(iv) (ii) (iii) (i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Polity

अयोग्य कथन ओळखा : (a) आंतर-राज्य परिषद 28 मे, 1990 रोजी स्थापन झाली. (b) आंतर-राज्य परिषदेची पुनर्रचना 11 नोव्हेंबर, 1999 मध्ये करण्यात आली. (c) राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 1950 मध्ये झाली. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) / Only (a)
  • )फक्त (b) / Only (b)
  • )फक्त (c) / Only (c)✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Polity

खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ? (a) स्वातंत्र्याचा हक्क - (कलम 14 ते 19) (b) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क - (कलम 29 व 30) (c) घटनात्मक उपाययोजनेचा हक्क - (कलम 32) (d) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क - (कलम 25 ते 28) योग्य पर्याय निवडा :

  • )(a), (b), (c)
  • )(b), (c), (d)✓ योग्य
  • )(a), (c), (d)
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Polity

पुढीलपैकी कोणते नियंत्रक व लेखा परीक्षकचे (CAG) काम नाही ?

  • )शासन खर्चाचे लेखापरीक्षण करणे.
  • )शासन खर्चावर परिणाम करणाऱ्या वित्तीय नियमांचे व आदेशांचे पालन होते आहे किंवा नाही ते पाहणे.
  • )जे पदाधिकारी शासन खर्चाला मंजुरी देत आहेत, ते वैधानिक दृष्ट्या त्या कार्यासाठी सक्षम आहेत की नाही, ते पाहणे.
  • )कल्याणकारी योजनांच्या खर्चाची शिफारस करणे.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७History

त्रिराज्य योजनेच्या विरोधात 18 नोव्हेंबर 1955 रोजी विधान सभेवर नेण्यात आलेल्या विराट मोर्चाचे नेतृत्व कोणी केले ? (a) सेनापती बापट (b) आचार्य अत्रे (c) स.का. पाटील (d) मोरारजी देसाई पर्यायी उत्तरे :

  • )केवळ (a) व (c)
  • )केवळ (b) व (d)
  • )केवळ (a) व (b)✓ योग्य
  • )केवळ (c) व (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Polity

मिळून बनलेल्या निर्वाचक मंडळाकडून भारताचा राष्ट्रपती निवडला जातो. (a) संसद व राज्यविधिमंडळाचे सर्व सदस्य (b) संसदेच्या दोन्हीही सभागृहाचे निर्वाचित सदस्य (c) राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य (d) फक्त संसदेचे सदस्य खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :

  • )केवळ (a)
  • )(b) आणि (c) केवळ✓ योग्य
  • )(c) आणि (d) केवळ
  • )केवळ (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Polity

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

  • )राज्यसभेच्या अध्यक्षाची निवड ही संसदेच्या फक्त निर्वाचित सदस्यांकडून होते.
  • )राज्यसभेचा अध्यक्ष हा संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्विकारू शकतो.
  • )राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी जे निर्वाचन मंडळ असते तेच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी असते.
  • )संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो परंतु राष्ट्रपतीच्या निवडणुकीत नसतो.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Polity

राज्यपालांच्या संबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

  • )राज्यपाल हे पहिल्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या संसदेच्या सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधीमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असू शकत नाही.
  • )राज्यपालांच्या कार्यकाळात त्यांचे वेतन व भत्त्यात कपात केली जाणार नाही.
  • )राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.
  • )वरीलपैकी सर्व.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Polity

खालीलपैकी कोणते विधान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाबद्दल सत्य नाही ?

  • )भारतीय घटनेच्या कलम 124 ते 147 आणि भाग पाच मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या रचना व अधिकारांची माहिती दिली गेली आहे.
  • )26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन झाले आणि ते सध्याच्या इमारतीमध्ये 1956 मध्ये हलविण्यात आले.✓ योग्य
  • )सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात.
  • )सर्व विधाने सत्य आहेत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Polity

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती होण्यासाठी पात्रतेचे निकष खालील प्रमाणे आहेत : (a) त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असली पाहिजे. (b) ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात दहा वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे. (c) ती व्यक्ती उच्च न्यायालयात दहा वर्षे वकिली करीत असलेली पाहिजे. (d) राष्ट्रपतींच्या मते तो व्यक्ती प्रसिद्ध कायदेतज्ञ असावी. पर्यायी उत्तरे :

  • )(a), (b) किंवा (d)
  • )(a), (c) किंवा (d)
  • )(b) किंवा (c)✓ योग्य
  • )(b) किंवा (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Polity

भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विविध राज्यातील आमदारांच्या मताचे मूल्य खालील सूत्रानुसार निश्चित होत असतात.

  • )राज्याची एकूण लोकसंख्या / राज्य विधान सभेत निवडून गेलेले सदस्य × 1/1000 Value of the vote of MLA = Total Population of State / No. of elected members in the State Legislative Assembly × 1/1000✓ योग्य
  • )राज्याची एकूण लोकसंख्या / राज्य विधान सभेत आणि विधान परिषदेत निवडून गेलेल्या सदस्यांची संख्या × 1/1000 Value of the vote of MLA = Total Population of State / No. of elected members in the State Legislative Assembly and Council × 1/1000
  • )राज्याची एकूण लोकसंख्या / राज्य विधान सभा व विधान परिषदेतील निवडून गेलेले व नामनिर्देशित झालेले सदस्यांची संख्या × 1/1000 Value of the vote of MLA = Total Population of State / Total members elected and nominated to the State Legislative Assembly and Council × 1/1000
  • )राज्याची एकूण लोकसंख्या / राज्य विधान सभेत निवडून गेलेल्या सदस्यांची संख्या × 2/1000 Value of the vote of MLA = Total Population of State / Total number of elected members in the State Legislative Assembly × 2/1000

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Polity

खालील विधाने विचारात घ्या : (a) सचिवालय हे राज्य प्रशासनाचे प्रमुख केंद्र (nerve centre) आहे. (b) सचिवालय हे राज्य शासनाच्या अनेक विभागांचे मिळून बनलेले असते. (c) सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रमुख असतो. (d) सचिवालय हे रेषा अभिकरण (line agency) आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )(a), (b), (c)
  • )(c) आणि (d)
  • )(b) आणि (c)
  • )(a) आणि (b)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Polity

गिलोटिनचे तत्व म्हणजे _______. (1) एकूण रकमेमधून विशिष्ट रक्कम कपात करणे. (2) एकूण रकमेमधून रु. 100 फक्त कपात करण्याची मागणी करणे. (3) एकूण रकमेमधून फक्त रु. 1 कपात करण्याची मागणी करणे. (4) कोणतीही चर्चा किंवा छाननीशिवाय मागणीवर थेट मतदान घेणे.

  • )A specific amount of sum is reduced.
  • )The amount of demand is reduced by Rs. 100 only.
  • )The amount of demand to be reduced to Re. 1.
  • )The demands are directly put to vote without any discussion or Scrutiny.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Polity

खालीलपैकी कोणता पर्याय भारताच्या महान्यायवादी संदर्भात चुकीचे आहे?

  • )राष्ट्रपती सरकारच्या सल्ल्याने महान्यायवादीची नियुक्ती करतात.
  • )तो/ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्त होण्यास पात्र असणारी व्यक्ती असावी.
  • )त्याने कोणत्याही उच्च न्यायालयात दहा वर्षे न्यायाधीशपदी काम केलेले असले पाहिजे.✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Polity

महाराष्ट्राच्या ‘लोक लेखा समिती’ बाबत खालील विधाने विचारात घ्या : (a) तो 25 पेक्षा अधिक सदस्यांची नसते. (b) 20 पेक्षा अधिक नाही इतके सदस्य अध्यक्षाद्वारे नामनिर्देशित केले जातात. (c) 5 पेक्षा अधिक नाही इतके सदस्य विधान परिषदेच्या सभापतीद्वारे नामनिर्देशित केले जातात. (d) लोक लेखा समितीचे राज्य शासनाचे वित्तीय लेख्यांची छाननी करणे हे कार्य असते. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

  • )(a), (b), (c)
  • )(b), (c), (d)
  • )(a), (b), (c), (d)✓ योग्य
  • )(a) आणि (d) only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Polity

योग्य कथने ओळखा : (राष्ट्रपतीचा नकाराधिकार) (a) राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी पेप्सू (PEPSU) विनियोग विधेयक 1954 मध्ये मान्यतेसाठी रोखून ठेवले. (b) 1991 मध्ये राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांनी संसद सदस्यांचे वेतन भत्ते व पेन्शन (दुरुस्ती) विधेयक मान्यतेसाठी रोखून ठेवले. (c) 1986 मध्ये राष्ट्रपती झैल सिंग यांनी भारतीय पोस्ट ऑफिस (दुरुस्ती) विधेयका संदर्भात पॉकेट व्हेटोचा वापर केला. पर्यायी उत्तरे :

  • )Only (a), (b)
  • )Only (a), (c)
  • )Only (b), (c)
  • )All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Polity

खालीलपैकी कोणते नगरपालाच्या बाबतीत सत्य नाही?

  • )मुंबईच्या नगरपाल (शेरिफ) कार्यालयाची स्थापना लेटर्स पेटंट ॲक्ट 1823 अनुसार झालेली आहे. / The office of sheriff of Mumbai was formed by Letters Patent Act of 1823.
  • )या पदाचा कार्यकाल एक वर्षा करीता असतो. / The term of office is one year.
  • )मुंबईचे नगरपाल हे वैधानिक दर्जा नसलेले परंतु प्रतिष्ठा असलेले पद आहे. / The sheriff of Mumbai is a post with no statutory status but with prestige.
  • )भारतातील फक्त मुंबई याच शहरात नगरपाल हे पद आहे. / Only Mumbai in India have the post of sheriff.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०History

महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषिक राज्यांच्या निर्मितीच्या वाटेत प्रमुख वादाचा मुद्दा कोणता होता?

  • )मुंबई हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापणे / Bombay city to be a separate, centrally administered territory✓ योग्य
  • )विदर्भ / Vidarbha
  • )मराठवाडा / Marathwada
  • )कच्छ / Kutch

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Polity

एस.आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पुढीलपैकी कोणती भूमिका घेतली?

  • )राज्यसरकारचे बहुमत विधान सभेत तपासले गेले पाहिजे. / Majority of the State Government should be tested and proved on the floor of the House.✓ योग्य
  • )अनुच्छेद 356 लागू करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेण्यात आला पाहिजे. / The Chief Minister should be consulted before imposing Article 356.
  • )राज्यपालांना नकाराधिकार दिला गेला पाहिजे. / Veto power should be given to the Governor.
  • )राज्यांना त्यांनी गोळा केलेल्या करातून मोठा वाटा दिला गेला पाहिजे. / States should get a bigger share of the taxes collected by them.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Polity

खालीलपैकी कोणते बरोबर जुळलेले नाही ?

  • )कलम 64 - उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील.
  • )कलम 66 - उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक.
  • )कलम 69 - उपराष्ट्रपती द्वारे घेण्यात येणारी शपथ.
  • )कलम 61 - उपराष्ट्रपतीचा कार्यकाल.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Polity

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल ?

  • )सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना ज्या प्रक्रियेने पदावरून काढले जाते त्याच प्रक्रिये द्वारे.✓ योग्य
  • )भारताच्या महान्यायवादी यांना ज्या पद्धतीने पदावरून काढले जाते त्याच पद्धती द्वारे.
  • )लोकसभेत प्रस्ताव मंजूर करून.
  • )केवळ अर्थमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Polity

भारतीय संविधानाच्या कोणत्या भाग आणि कलमांत केंद्र-राज्य वैधानिक संबंधांचा उल्लेख आहे ?

  • )भाग-XI (कलम 245 ते 255)✓ योग्य
  • )भाग-X (कलम 244)
  • )भाग-VIII (कलम 239 ते 242)
  • )भाग-XII (कलम 264 ते 291)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Polity

खालील विधाने विचारात घ्या : (a) भारताच्या राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होण्या अगोदर त्या व्यक्तीने विधान सभेमध्ये आपले बहुमत सिद्ध केले पाहिजे. (b) राज्याच्या विधिमंडळाची सदस्य नसलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होऊ शकते. (c) मंत्रिमंडळाच्या शक्तीचे निर्धारण हा कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी मताचा विषय नाही मग ती व्यक्ती राज्यपाल अथवा राष्ट्रपती असो. (d) मुख्यमंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्यपालाद्वारे निश्चित केले जातात.

  • )विधाने (a) आणि (b) बरोबर आहेत / Statements (a) and (b) are correct
  • )विधाने (b) आणि (c) बरोबर आहेत / Statements (b) and (c) are correct✓ योग्य
  • )विधाने (b), (c) आणि (d) बरोबर आहेत / Statements (b), (c) and (d) are correct
  • )विधाने (a), (c) आणि (d) बरोबर आहेत / Statements (a), (c) and (d) are correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Polity

एकच व्यक्ती दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त असेल तर त्यांना द्यावयाची चित्तलष्बी आणि भत्ते खालीलप्रमाणे दिले जातात : (1) कोणत्याही एकाच राज्याद्वारे (2) केंद्र सरकार स्वतः देईल (3) राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे दोन्ही राज्यांतून विभागून (4) वरीलपैकी एकही नाही

  • )कोणत्याही एकाच राज्याद्वारे / From any one state
  • )केंद्र सरकार स्वतः देईल / From Central Government
  • )राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे दोन्ही राज्यांतून विभागून / President will decide the proportion of payment from concerned states✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही / None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Current Affairs

2011 मध्ये कोणत्या भारतीय पंतप्रधानांना बांगलादेश सरकारने 'बांगलादेशी स्वाधीनता सन्मानोन पुरस्कारा' ने गौरवीले ?

  • )राजीव गांधी
  • )इंदिरा गांधी✓ योग्य
  • )मनमोहन सिंग
  • )अटलबिहारी वाजपेयी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Polity

भारतीय राज्यघटनेसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? (a) अनुच्छेद 368 अनुसार राज्यघटना दुरुस्त करावयाची असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. (b) घटक राज्यात एखादे विधेयक हे अर्थ विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांनी दिलेला निर्णय अंतिम असतो. (c) कोणत्याही विभागीय अथवा प्रशासिनिक खटल्यासह सर्व खटल्यात कोणत्याही व्यक्तिस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळी आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तराची निवड करा.

  • )(a) आणि (b)
  • )(b) आणि (c)
  • )वरीलपैकी एकही नाही✓ योग्य
  • )फक्त (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Polity

भारतातील संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात, खालील कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत ? (a) संविधानाची सर्वोच्चता (b) केंद्र व राज्य सरकारांमध्ये सत्तेची विभागणी (c) स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे अस्तित्व (d) केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :

  • )(a), (b) आणि (d)
  • )(b) आणि (c) फक्त
  • )(b), (c) आणि (d)
  • )(a), (b) आणि (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Polity

भारतासाठी संसदेचे द्विगृही कायदेमंडळ पद्धत स्वीकारण्यामागे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही ?

  • )घटक राज्यांना प्रतिनिधित्व मिळवून देणे.
  • )संघराज्य पद्धतीचे एक वैशिष्ट्य जपणे.
  • )कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत सखोल विचार विनिमय करून पुनर्विचार करता येणे.
  • )राजकीय पक्षामधील महत्त्वाच्या नेत्यांना संसदेवर निवडून आणणे.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Polity

पंचायत समितीच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ? (a) पंचायत समिती ही पंचायत राज व्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे. (b) पंचायत समिती राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्यात दुवा साधण्याचे कार्य करते. (c) यांना महिन्यातून एक सभा बोलावणे आवश्यक असते. (d) पंचायत समितीचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. योग्य पर्याय निवडा : (1) (a), (b), (c) (2) (c), (d) (3) (a), (d) (4) (b), (c), (d)

  • )(a), (b), (c)
  • )(c), (d)✓ योग्य
  • )(a), (d)
  • )(b), (c), (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Polity

74 व्या राज्य घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे म्युनिसिपल कौन्सिल (नगर-पालिका) यांना काही कर्तव्ये व जबाबदाऱ्या अनुच्छेद ______ अन्वये सोपविण्यात आलेल्या आहेत.

  • )243 - V
  • )243 - W✓ योग्य
  • )243 - Y
  • )243 - Z

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Polity

74 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

  • )मुळतः ऑगस्ट 1989 मध्ये राजीव गांधी सरकार द्वारा 65 वे घटनादुरुस्ती विधेयक मांडले गेले त्यास लोकसभेने जरी मंजुरी दिली होती तरी राज्यसभेने मंजुरी न दिल्याने ते रद्द झाले. / Originally introduced as the 65th Amendment bill in August 1989 by the Rajiv Gandhi government although it was passed in the Lok Sabha but did not get assent of Rajya Sabha and hence lapsed.
  • )व्ही.पी. सिंग सरकारने सुधारित नगरपालिका विधेयक 1990 मध्ये मांडले होते परंतु लोकसभेच्या विसर्जनामुळे ते रद्द झाले. / A revised Nagarpalika bill was introduced by V.P. Singh government in 1990 but lapsed as the Lok Sabha was dissolved.
  • )नरसिंहराव सरकारने सप्टेंबर 1992 मध्ये सुधारित नगरपालिका विधेयक मांडले आणि ते संसदेच्या दोन्ही सभागृहांनी डिसेंबर 1992 मध्ये 74 वी घटनादुरुस्ती म्हणून मंजूर केले. 1 एप्रिल 1993 पासून तो लागू झाला. / Narasimha Rao government introduced the modified Municipalities bill in Sept. 1992 and passed by the both Houses of Parliament in Dec. 1992 as the 74th amendment. It was brought into force on April 1, 1993.✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही. / None of the above.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Polity

छावणी क्षेत्रापालिकेशी संबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

  • )छावणी क्षेत्रापालिका अधिनियम 2006 अन्वये 1924 चा छावणी अधिनियम रद्द करण्यात आला.✓ योग्य
  • )छावणी क्षेत्रापालिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड निर्वाचित सदस्य आपल्यामधून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करतात.
  • )छावणी क्षेत्रापालिकांचे वर्गीकरण नागरी लोकसंख्येच्या आधारे दोन प्रकारात केले जाते.
  • )महाराष्ट्रात सहा छावणी क्षेत्रापालिका आहेत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Polity

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खालीलपैकी कोणते घटक जिल्हाधिकारी या पदाची भूमिका, दर्जा आणि अधिसत्ता बदलण्यास जबाबदार आहेत ? (a) संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे अधिकार आणि अधिसत्ता मंत्र्यांच्या हाती एकत्रित झाली. (b) जिल्हाधिकारी यांना खासदार, आमदार आणि स्थानिक राजकीय व सामाजिक वरिष्ठांशी संबंध ठेवावे लागतात. (c) पंचायत राज्य नव्या राजकीय वर्गाचा उदय होण्यास कारणीभूत झाला आहे. (d) राजकीय नेत्यांच्या दृष्टीने पोलीस हे विशेष महत्त्वाचे बनल्याचे दिसते. पर्यायी उत्तरे :

  • )(a) आणि (c)
  • )(a), (b) आणि (c)
  • )(a), (c) आणि (d)
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Polity

जोड्या लावा : 'A' (राज्य) (a) आसाम (b) कर्नाटक (c) मध्य प्रदेश (d) अरुणाचल प्रदेश 'B' (जिल्हा परिषद/पंचायत समितीचे नांव) (i) अंचल समिती (ii) महकमा परिषद (iii) जिल्हा विकास परिषद (iv) जनपद पंचायत

  • )(i) (ii) (iii) (iv)
  • )(ii) (iii) (iv) (i)✓ योग्य
  • )(ii) (iv) (iii) (i)
  • )(i) (iii) (iv) (ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Polity

जिल्हा परिषदेच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान(ने) बरोबर आहे(त)? (a) ग्रामीण आणि शहरी लोकांना अत्यावश्यक सेवा व सवलती पुरविणे आणि जिल्ह्यासाठी विकास कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणे. (b) शहरी भागात शाळा स्थापन करून त्या चालविणे. (c) ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व दवाखाने सुरू करणे.

  • )(a) आणि (c)
  • )फक्त (c)✓ योग्य
  • )फक्त (a)
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Polity

दुसऱ्या प्रशासकीय सुधार आयोगाने आपल्या सहाव्या अहवालात स्थानिक शासन आणि लोकशाही विकेन्द्रीकरणाबाबत कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत?

  • )(a) भ्रष्टाचार व कुप्रशासनांवरील तक्रारी हाताळण्यासाठी स्थानिक संस्था लोकपालाची (Ombudsman) निर्मिती करण्यात यावी.
  • )(b) जलदगतीने होणाऱ्या शहरीकरणाबाबतच्या समस्यांवरील उपाय सुचविण्यासाठी एक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात यावा.
  • )(c) महापौरांची थेट निवडणूक.
  • )(d) दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये महानगरीय वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्यात यावे.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Polity

73 व्या घटनादुरुस्ती कायद्याची खालीलपैकी कोणती तरतूद (वैशिष्ट्य) ऐच्छिक आहे?

  • )ग्रामसभा स्थापन करणे
  • )सर्व स्तरांवर सर्व जागांवर प्रत्यक्ष निवडणुका
  • )निवडणूक लढविण्यासाठी किमान वय 21 वर्षे
  • )पंचायत राज संस्थांना स्वायत्त बनविणे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Polity

जिल्हाधिकाऱ्याच्या पदासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (a) वॉरन हेस्टिंग्जने हे पद निर्माण केले. (b) हे पद 1774 मध्ये निर्माण केले. (c) मुघल काळातील करोरी-फौजदाराच्या जागी हे पद आले. (d) भारत सरकारच्या हत्ती, जिल्हाधिकारी या कासवाच्या पाठीवर उभा आहे अशी तुलना सर विल्यम विल्सन यांनी केली होती. पर्यायी उत्तरे :

  • )(a) आणि (b)
  • )(b) आणि (c)
  • )(a), (b), (c) आणि (d)
  • )(a) आणि (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Polity

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  • )भारतात 'जिल्हा' हा प्रशासनाचा मूलभूत क्षेत्रीय घटक आहे.
  • )मुळतः भारतीय राज्यघटनेने 'जिल्हा' हा शब्दप्रयोग अनुच्छेद 233 ते 236 व्यतिरिक्त अन्यत्र उल्लेख केलेला दिसत नाही.
  • )73 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाव्दारे 'जिल्हा' हा शब्दप्रयोग राज्यघटनेच्या भाग XI आणि XI A मध्ये अनेक ठिकाणी समाविष्ट केलेला आहे.✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Polity

जर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या एखाद्या विशेष सभेत एकूण परिषद सदस्यांपैकी ___________ कमी नसेल इतक्या परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास अधिकार पदावरून परत बोलावण्याची राज्यशासनाकडे मागणी करणाऱ्या ठरावाच्या बाजूने मत दिल्यास राज्य शासन अशा अधिकाऱ्यास परिषदेच्या सेवेतून परत बोलावून घेईल.

  • )एक-द्वितीयांश (1/2) / One-Half (1/2)
  • )दोन-तृतीयांश (2/3) / Two-thirds (2/3)✓ योग्य
  • )तीन-चतुर्थांश (3/4) / Three-fourth (3/4)
  • )दोन-पंचमांश (2/5) / Two-fifth (2/5)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polity

कोणत्या समितीला 'महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती' सुद्धा म्हटले जाते ?

  • )पी.बी. पाटील समिती / P.B. Patil Committee
  • )अशोक मेहता समिती / Ashok Mehta Committee
  • )बोंगिरवार समिती / Bongirwar Committee
  • )वसंतराव नाईक समिती / Vasantrao Naik Committee✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

देशात पंचायत राज संस्थांना चालना देणाऱ्या 73 व्या घटनादुरुस्ती अधिनियमात खालीलपैकी कोणत्या तरतूद/दी केलेल्या आहेत ? (a) जिल्हा नियोजन समितीची संरचना करणे. (b) महिलांसाठी 50% जागांचे आरक्षण. (c) राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोगाची स्थापना. (d) सर्व स्तरांवरील सदस्यांची आणि अध्यक्षांची थेट/सरळ निवड.

  • )(a), (b) आणि (c) / (a), (b) and (c)
  • )(a), (c) आणि (d) / (a), (c) and (d)
  • )फक्त (a) आणि (b) / Only (a) and (b)
  • )फक्त (c) / Only (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Polity

खालीलपैकी कोणाच्या अनुमदानाने सर्वोच्च न्यायालय दिल्ली सोडून भारतातील इतर ठिकाणी सुद्धा चालविले जाऊ शकते?

  • )भारताचे मुख्य न्यायमूर्ती
  • )भारताचे पंतप्रधान
  • )भारताचे राष्ट्रपती✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणीही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Polity

खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेददाने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला स्वेच्छा अधिकारक्षेत्र (विवेकाधिकार) प्रदान केले आहे?

  • )अनुच्छेद 141
  • )अनुच्छेद 142
  • )अनुच्छेद 136✓ योग्य
  • )अनुच्छेद 226

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Polity

एखादी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्तीस पात्र असणार नाही जो पर्यंत तो भारताचा नागरिक असणार नाही, आणि

  • )(a) एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा दोन किंवा अधिक न्यायालयांची निदान सलग 5 वर्षे न्यायाधीश किंवा,
  • )(b) एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयांचा निदान सलग 10 वर्षे अधिवक्ता किंवा,✓ योग्य
  • )(c) राष्ट्रपतींच्या मते विख्यात विधीवेत्ता किंवा,
  • )(d) तो जिल्हा व सत्र न्यायालयात सलग 15 वर्षे अधिवक्ता असावा.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Polity

खालील दोन विधानांचे अवलोकन करा : (a) प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. (b) प्रत्येक न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील.

  • )(a) विधान अचूक आहे पण (b) चूक आहे.
  • )(a) आणि (b) दोन्ही विधाने अचूक आहेत.✓ योग्य
  • )विधान (b) हे (a) विधानाशी संबंधित नाही.
  • )दोन्ही विधाने चूक आहेत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Economy

गरिबांचा वर्ग ओळखण्याचे आधार काय आहेत ? (a) भूमिहीन शेतमजूर (b) ग्रामीण व शहरी गरीब व्यक्ती (c) अल्प व सिमांत भूधारक मजूर (d) अशिक्षित व्यक्ती (a) Landless agricultural labour (b) Rural and urban poor person (c) Small and marginal holding labour (d) Uneducated person

  • )(a) आणि (b) / (a) and (b)
  • )(a) आणि (c) / (a) and (c)✓ योग्य
  • )फक्त (b) / Only (b)
  • )यापैकी सर्व / All above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Economy

भारतातील बाजार आणि आर्थिक नियोजन परस्परांना _________ आहेत.

  • )जोड देणारे / Supplementary
  • )पूरक / Complementary✓ योग्य
  • )स्पर्धक / Competative
  • )तटस्थ / Neutral

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Economy

आर्थिक सुधारणे संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. (a) सरकारच्या भूमिकेचे रूपांतर नियंत्रकाकडून सुविधा पुरविणारा असे झाले आहे. (b) पायाभूत क्षेत्रातील सुधारणेसाठी सरकार बांधील आहे. (c) पंचायत राज संस्था पूर्णपणे कार्यान्वित करण्यास सरकार बांधील आहे. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने सत्य आहे/आहेत ?

  • )(a) आणि (b) / (a) and (b)
  • )(b) आणि (c) / (b) and (c)
  • )(a) आणि (c) / (a) and (c)
  • )वरील सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Polity

73 आणि 74 व्या घटना दुरुस्ती कायद्यातील कलम 243 D चे ठळक वैशिष्ट्य _________ आहे.

  • )एकूण जागांच्या एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील / One-third of the total number of seats to be reserved for women✓ योग्य
  • )एकूण जागांच्या एक द्वितीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील / One-half of the total number of seats to be reserved for women
  • )एकूण जागांच्या एक चतुर्थांश जागा महिलांसाठी राखीव असतील / One-fourth of the total number of seats to be reserved for women
  • )एकूण जागांच्या दोन तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील / Two-third of the total number of seats to be reserved for women

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Economy

खालील विधाने विचारात घ्या. (a) सेवा क्षेत्रातील उत्पादनाच्या तुलनेत रोजगारातील वाढ कमी दराने झाली आहे. (b) 1990 च्या काळात सेवा क्षेत्रातील रोजगार वृद्धी पेक्षा भारतातील श्रमिकांची सरासरी उत्पादकता वृद्धी जास्त होती. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

  • )फक्त (a)
  • )फक्त (b)
  • )(a) आणि (b)✓ योग्य
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Polity

74 व्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या बाबी आवश्यक होत्या ? (a) जिल्हा नियोजन समितीची स्थापना (b) तालुका समितीची स्थापना (c) शिक्षणाचा हक्क (d) महानगर समितीची स्थापना

  • )(a) आणि (d)✓ योग्य
  • )फक्त (a)
  • )(a) आणि (b)
  • )यापैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Economy

दारिद्र्य निर्मूलनाशी कोणते कार्यक्रम निगडीत आहेत ? (a) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (b) इंदिरा आवास योजना (c) रस्ते विकास कार्यक्रम (d) ग्रामीण शिक्षण

  • )(a) आणि (b)✓ योग्य
  • )फक्त (b)
  • )यापैकी नाही
  • )यापैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Economy

ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम (RLEGP) केव्हा सुरु करण्यात आला ?

  • )15 ऑगस्ट 1972
  • )15 ऑगस्ट 1983✓ योग्य
  • )15 ऑगस्ट 1991
  • )15 ऑगस्ट 1993

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Economy

नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये (1981 ते 2012) सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा (GDP) दर ______ टक्के होता.

  • )3.5
  • )5.7
  • )5.9✓ योग्य
  • )4.2

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2020-aso-paper-ii