स्पर्धाAI

MPSC राज्यसेवा २०१९

GS Paper I · ४३ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Science

इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये (डिजिटल) अंकात्मक संदेश: अ. सलग संदेश संच पुरवत नाहीत. ब. स्वतंत्र (विलग) पायऱ्यांमध्ये सादर केले जातात. क. बायनरी (द्विमान) संख्यापद्धतीचा उपयोग करतात. ड. दशमान आणि द्विमान (बायनरी) या दोन्ही संख्यापद्धतींचा उपयोग करतात. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )अ, ब आणि क✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

अणुकेंद्रका भोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेतील भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती ?

  • )1.51 J
  • )3.4 eV
  • )1.51 eV✓ योग्य
  • )13.6 eV

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे ? अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावर पर्यायी उत्तरे :

  • )अ, ब आणि क
  • )फक्त क✓ योग्य
  • )ब आणि ड
  • )फक्त ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

पुढील विधानांचा विचार करा : अ. ऋण भारित बीटा कण हे धन भारित अल्फा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात. ब. उदासीन (धन अथवा ऋण नसलेले) गामा कण हे बीटा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात. क. सर्वसाधारणपणे उदासीन कणांची (धन अथवा ऋण भारित नसलेले) अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते. पर्यायी उत्तरे :

  • )अ आणि ब विधाने त्रिकालाबाधित सत्य आहेत.✓ योग्य
  • )अ आणि ब विधाने चूक आहेत परंतु क विधान बरोबर आहे.
  • )क विधान हे अ आणि ब ची फलनिष्पत्ती आहे.
  • )क विधान हे अ आणि ब ची फलनिष्पत्ती नाही.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबीचे संवर्धन होईल ?

  • )संपूर्ण गतिज ऊर्जा / Total kinetic energy
  • )संपूर्ण यांत्रिक ऊर्जा / Total mechanical energy
  • )संपूर्ण एकरेषीय ऊर्जा / Total linear momentum✓ योग्य
  • )प्रत्येक वस्तुची गती / Speed of each body

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

कोणत्या जनुकीय रूपांतरित पीकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अ जीवनसत्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत ?

  • )कल्याण सोना गहू / Kalyan Sona wheat
  • )मधुर ज्वारी / Sweet sorghum
  • )संकरीत बाजरी / Hybrid bajra
  • )सुवर्ण तांदुळ / Golden rice✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

नाकतोड या किटकाच्या नर आणि मादी मध्ये किती सहलग्नता गट असतात ?

  • )04 आणि 04 / 04 and 04
  • )10 आणि 10 / 10 and 10
  • )12 आणि 12 / 12 and 12✓ योग्य
  • )23 आणि 24 / 23 and 24

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

कोणत्या वनस्पतीमध्ये एच.एस.के. अथवा C₄ या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण होते ?

  • )ऊस / Sugarcane✓ योग्य
  • )भुईमूग / Groundnut
  • )सुर्यफुल / Sunflower
  • )बटाटा / Potato

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Science

रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी) कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात ?

  • )सेंद्रिय द्रव्ये / Organic
  • )असेंद्रिय द्रव्ये / Inorganic✓ योग्य
  • )कृत्रिम द्रव्ये / Synthetic
  • )प्रक्रिया केलेली द्रव्ये / Processed

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Science

मानवाच्या शरीरातील नेफ्रॉन्स मध्ये युरीन बनविण्याचा योग्य घटनाक्रम कोणता ?

  • )सिलेक्टीव रिअॅबसॉर्प्शन, ट्युब्युलर सिक्रिशन आणि अल्ट्राफिल्ट्रेशन
  • )अल्ट्राफिल्ट्रेशन, ट्युब्युलर सिक्रिशन आणि सिलेक्टीव रिअॅबसॉर्प्शन
  • )अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टीव रिअॅबसॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रिशन✓ योग्य
  • )ट्युब्युलर सिक्रिशन, सिलेक्टीव रिअॅबसॉर्प्शन आणि अल्ट्राफिल्ट्रेशन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Science

खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असेल ?

  • )Rh⁺ पुरुष व Rh⁻ स्त्री चे विवाह✓ योग्य
  • )Rh⁻ पुरुष व Rh⁺ स्त्री चे विवाह
  • )Rh⁺ पुरुष व Rh⁺ स्त्री चे विवाह
  • )Rh⁻ पुरुष व Rh⁻ स्त्री चे विवाह

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Science

खालील जोड्या जुळवा : अ. हिमोग्लोबिन ब. क्लोरोक्रुओरीन क. हिमएरिथ्रीन ड. हिमोसायनिन I. ॲनेलिड्स II. पृष्ठवंशीय III. लिंगुला IV. मोल्युस्कस

  • )II III I IV
  • )II I III IV✓ योग्य
  • )III II IV I
  • )IV III I II

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Science

अनिल्य तंतू आणि स्नायु संकुचन सिद्धांता बाबत खालील विधाने लक्षात घ्या : अ. हा सिद्धांत आधुनिक स्नायु संकुचन संकल्पना स्पष्ट करतो. ब. हा सिद्धांत हक्सले आणि निडरजरके या शास्त्रज्ञांनी मांडला. वरीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत ? पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ / Only a
  • )फक्त ब / Only b
  • )अ आणि ब दोन्ही / Both a and b✓ योग्य
  • )कोणते ही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Science

कॅल्सिनेशन प्रक्रियेतून ______ बाहेर पडतो.

  • )फक्त कार्बनडायऑक्साईड बाहेर पडतो / Only CO2 is given out
  • )फक्त हैड्रेटमधून पाणी बाहेर पडते / Only H2O from hydrates is given out
  • )(1) किंवा (2) हे धातूकां वर अवलंबून असते / (1) or (2), depending on type of ore✓ योग्य
  • )हायड्रोजन सल्फाईड बाहेर पडतो / H2S is given out

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Environment

हरित रसायन शास्त्र म्हणजे

  • )हरितगृह वायुमुळे दररोजच्या वापरातील रसायने तयार करणे / Producing chemicals of our daily use from greenhouse gases
  • )रासायनिक अभिक्रिया हिरव्या वनस्पतीपासून तयार करणे / Performing chemical processes which use green plants
  • )जैविक घटकापासून अभिक्रिया बनविणे/तयार करणे / Performing only those reactions which are of biological origin
  • )बिनाविषारी द्रव्ये आणि द्राव्ये वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे / The use of non-toxic reagents and solvents to produce environmentally-friendly products✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Science

खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही ?

  • )बेरियम क्लोराईड (BaCl2) / Barium chloride (BaCl2)✓ योग्य
  • )बोरोन ट्राय क्लोराईड (BCl3) / Boron trichloride (BCl3)
  • )बेरीलीयम क्लोराईड (BeCl2) / Beryllium chloride (BeCl2)
  • )बोरोन ट्राय फ्लोराईड (BF3) / Boron trifluoride (BF3)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Science

खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (अ) HF आणि H2O ही ध्रुवीय संयुगे आहेत. (ब) CH4 आणि CO2 ही ध्रुवीय संयुगे नाहीत. (क) CO2 आणि SO2 ही ध्रुवीय संयुगे नाहीत.

  • )फक्त अ आणि ब✓ योग्य
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त अ आणि क
  • )अ, ब आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Polity

भारतीय स्वातंत्र्य कायदा - 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या : अ. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ब. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. क. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे, तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र प्रसाद असत. ड. संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. पर्यायी उत्तरे :

  • )विधाने अ, ब आणि क बरोबर
  • )विधाने ब, क आणि ड बरोबर
  • )विधाने अ, ब आणि ड बरोबर✓ योग्य
  • )विधाने अ, क आणि ड बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Polity

1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही ?

  • )कॅबिनेटच्या लेखी शिफारशी शिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही.
  • )'अंतर्गत अशांतता' या ऐवजी 'सशस्त्र बंडाळी' हा शब्दप्रयोग करण्यात आला.
  • )अनुच्छेद 19 खाली असलेले सहा मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील, सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत.
  • )जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Polity

खालील विधाने विचारात घ्या: अ. मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. ब. 1961 च्या 11 व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. क. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडमंडळाकडून केली जाते. ड. निवड मंडळ (Electoral College) अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त ब, क आणि ड✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Polity

खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही ?

  • )11 डिसेंबर, 1946 : जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. / 11th December, 1946 : Jawaharlal Nehru moved the Objective Resolution in the Constituent Assembly.✓ योग्य
  • )29 ऑगस्ट, 1947 : मसुदा समितीची स्थापना / 29th August, 1947 : Drafting committee was set up
  • )26 नोव्हेंबर, 1949 : भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. / 26th November, 1949 : The people of India adopted, enacted and gave to themselves the Constitution.
  • )24 जानेवारी, 1950 : संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमत: संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. / 24th January, 1950 : Constitution was finally signed by the members of the Constituent Assembly.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Polity

राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती अ. विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. ब. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. क. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधन कारक असते. ड. पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास सहा महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? पर्यायी उत्तरे :

  • )अ आणि ब / a and b✓ योग्य
  • )अ, ब आणि क / a, b and c
  • )अ, ब आणि ड / a, b and d
  • )अ, क आणि ड / a, c and d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Polity

भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन सुचवते. (1) कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार (2) कायदेमंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार (3) कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्याअगोदर पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार (4) आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार

  • )The power of the judiciary to pronounce upon the constitutionality of laws and executive orders.✓ योग्य
  • )The power of the judiciary to question the wisdom of the laws enacted by the legislatures.
  • )The power of the judiciary to review all the legislative enactments before they are assented to by the President.
  • )The power of the judiciary to review its own judgements given earlier in similar or different cases.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Polity

खालील विधानांपैकी कोणते विधान/ने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेले आहे/त ? अ. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. ब. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लीम असला पाहिजे. क. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )वरीलपैकी एकही नाही✓ योग्य
  • )अ आणि ब

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Polity

खालील विधाने विचारात घ्या: अ. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. ब. सध्या पाच राज्यांना विधान परिषद आहे. क. केरळ आणि गुजरात मध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत. ड. विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )अ, ब आणि क
  • )ब आणि क
  • )क आणि ड
  • )अ आणि ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Polity

खालीलपैकी कोणते/ती विधाने/ने चुकीचे आहे/त ? अ. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे, हे स्पष्ट करावे लागते. ब. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितली आहे. क. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे. ड. इटली मध्ये सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागृहांच्या पाठिंब्या ची गरज असते. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त क
  • )ब आणि क
  • )अ आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Polity

भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? (1) केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. (2) मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहे. (3) मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत. (4) जर एखाद्या बाबीतील मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबीचा निर्णय बहुमताने घेतला जातो.

  • )केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही.
  • )मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहे.✓ योग्य
  • )मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत.
  • )जर एखाद्या बाबीतील मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबीचा निर्णय बहुमताने घेतला जातो.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Polity

खालील विधाने विचारात घ्या : अ. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भू प्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे. ब. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापने संबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतूद प्रदान करते. क. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/त ? पर्यायी उत्तरे :

  • )वरील सर्व
  • )अ आणि ब✓ योग्य
  • )ब आणि क
  • )फक्त क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Polity

लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? (1) कायदेशीर सेवा अधिमान्य अधिनियम (Legal Services Authorities Act) 1987 नुसार लोकन्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला. (2) लोकन्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच समावेश होऊ शकतो. (3) लोकन्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. (4) लोकन्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाचे दिलेले निवाड्यासममान असतो.

  • )Under the Legal Services Authorities Act of 1987, Lok Adalats have been given a statutory status.
  • )Lok Adalats can be constituted of serving or retired judicial persons only.✓ योग्य
  • )Every award made by the Lok Adalat is final and binding on the parties.
  • )The award passed by the Lok Adalat is deemed to be a decree of a civil court.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Polity

राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या : अ. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती. ब. आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली हे होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य एच.व्ही.कामथ आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. क. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर, 1954 रोजी सादर केला. ड. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट, 1956 रोजी मंजूर झाला. इ. राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी, 1957 रोजी अमलात आला. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

  • )अ, ब आणि क
  • )ब, क आणि ड
  • )ब, ड आणि इ
  • )अ आणि ड फक्त✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Current Affairs

एकतेच्या पुतळ्या बाबत (Statue of Unity) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

  • )182 मीटर उंच असलेला एकतेचा पुतळा हा न्यूयॉर्क च्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा (Statue of Liberty) आकाराने दुप्पट उंचीचा असेल.
  • )पुतळ्याची मिटरमध्ये असलेली उंची ही गुजरातच्या एकूण विधानसभा मतदार संख्येच्या बरोबरीची साधली आहे.
  • )31 ऑक्टोबर, 2018 हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा 145 वा जन्मदिवस म्हणून साजरा केला गेला.✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Science

खालील विधाने विचारात घ्या : अ. मानवी सांगाड्यात पाच प्रकारची हाडे असतात. ब. वजनाला आधार देणे आणि हालचाली सुलभ करणे ही लांब हाडांची (Long bones) कार्ये आहेत. क. स्नायुबंधांना दबावापासून वाचविणे हे सपाट हाडांचे (Flat bones) कार्य आहे. पर्यायी उत्तरे :

  • )विधाने अ आणि ब बरोबर / Statements a and b are correct✓ योग्य
  • )विधाने ब आणि क बरोबर / Statements b and c are correct
  • )विधाने अ आणि क बरोबर / Statements a and c are correct
  • )सर्व विधाने बरोबर / All the statements are correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Current Affairs

परमाणू पुरवठादार गटा (NSG) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

  • )सुरुवातीला परमाणू पुरवठादार गटात सात सरकारे सहभागी होती. / Initially the NSG had seven participating governments.
  • )2018 पर्यंत परमाणू पुरवठादार गटात 51 सरकारे सहभागी होती. / As of 2018, the NSG has 51 participating governments.✓ योग्य
  • )2018-19 साठी परमाणू पुरवठादार गटाच्या अध्यक्षपदी लाटव्हिया आहे. / The NSG chair for 2018-19 is Latvia.
  • )अणु तंत्रज्ञान निर्यातदार बनण्यासाठी भारत हा परमाणू पुरवठादार गटात सामिल होवू इच्छितो. / India seeks to join the NSG to become an exporter of nuclear technology.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Polity

भ्रष्टाचार प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक 2018 बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? (1) या विधेयकात लाच देणे हा आता गुन्हा ठरविणारी खास तरतूद करण्यात आली आहे. (2) या विधेयकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील विविध तरतुदी बदलल्या आहेत. (3) या विधेयकात न्यायमूर्ती बी. एस. चौहान यांच्या अध्यक्षते खालील 21 व्या विधी आयोगाने केलेल्या शिफारशी चा समावेश करण्यात आला आहे. (4) सनदी सेवकांना लाच देणाऱ्या नागरिकांना दोषी ठरविल्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यास युनोच्या भ्रष्टाचार विरोधी परिषद च्या तत्वांशी सुसंगत करण्यात आले आहे.

  • )या विधेयकात लाच देणे हा आता गुन्हा ठरविणारी खास तरतूद करण्यात आली आहे.
  • )या विधेयकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील विविध तरतुदी बदलल्या आहेत.
  • )या विधेयकात न्यायमूर्ती बी. एस. चौहान यांच्या अध्यक्षते खालील 21 व्या विधी आयोगाने केलेल्या शिफारशी चा समावेश करण्यात आला आहे.✓ योग्य
  • )सनदी सेवकांना लाच देणाऱ्या नागरिकांना दोषी ठरविल्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यास युनोच्या भ्रष्टाचार विरोधी परिषद च्या तत्वांशी सुसंगत करण्यात आले आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Current Affairs

31 जानेवारी, 2018 रोजी जगाच्या मोठ्या भागात दुर्मिळ अशी 'ब्लू मून' ही घटना अनुभवली गेली. या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या : अ. ब्लू मून, सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एकाच दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता. ब. जेव्हा दोन पूर्ण चंद्र एकाच कॅलेंडर महिन्यात दिसतात तेव्हा दुसऱ्या चंद्रास 'सुपर मून' म्हणून संबोधले जाते. क. जेव्हा पूर्ण चंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा 'ब्लू मून' म्हणून संबोधले जाते. योग्य विधाने

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त अ आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Current Affairs

'स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार, 2018' बाबत खालील विधाने विचारात घ्या : अ. भारतात हरियानास सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे. ब. भारतात महाराष्ट्रास दुसऱ्या सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे. क. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यास सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळाले आहे. ड. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यास सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले आहे. पर्यायी उत्तरे :

  • )अ, ब आणि क
  • )ब, क आणि ड
  • )अ, क आणि ड✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Current Affairs

खालील विधाने विचारात घ्या : अ. जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत. ब. जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसा स्थळे इटलीमध्ये आहेत. (जुलै 2018 पर्यंत) क. भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत. (जुलै 2018 पर्यंत) ड. मुंबई मधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतींच्या संग्रहास 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )अ, ब आणि ड✓ योग्य
  • )ब, क आणि ड
  • )अ, ब आणि क
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Current Affairs

खालील विधाने विचारात घ्या : अ. भारताची युनोच्या मानवी हक्कांच्या संदर्भातील सर्वोच्च संस्थेवर 1 जानेवारी, 2019 पासून सुरु होणाऱ्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे. ब. युनोच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणुकीत आशिया पॅसिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक अशी 188 मते भारतास मिळाली. क. भारत हा यापूर्वी जिनिव्हा स्थित मानवी हक्क परिषदेवर 2010 - 2013 आणि 2013 - 2016 या कार्यकाळासाठी निवडला गेला होता. वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहेत ?

  • )फक्त अ
  • )अ आणि ब✓ योग्य
  • )फक्त क
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Science

जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता ? (जून 2018 अखेर)

  • )टियान्हे (चीन)
  • )सनवे टायहुलाईट (चीन)
  • )समिट (अमेरिका)✓ योग्य
  • )टायटन (अमेरिका)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Current Affairs

खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे/त ? अ. भारताने म्यानमारच्या सीमेवर असलेलेला मिझोरम राज्यातील झोखावथार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरु केला आहे. ब. म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावथार हा झोरिनपूरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे. क. म्यानमार बरोबर भारतीय 1751 कि.मी. लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय या राज्यांना स्पर्श करते. पर्यायी उत्तरे:

  • )अ आणि ब✓ योग्य
  • )अ आणि क
  • )अ, ब आणि क
  • )फक्त अ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Environment

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? (1) भारताचे पहिले पर्यावरण पूरक जैव इंधन (bio-fuel) युक्त विमान चेन्नई आणि बेंगळूर दरम्यान उडाले. (2) भारताने नुकतेच आपले जैव इंधन 2018 चे राष्ट्रीय धोरण जाहिर केले आहे. (3) या धोरणानुसार 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (4) वरीलपैकी एकही नाही

  • )भारताचे पहिले पर्यावरण पूरक जैव इंधन (bio-fuel) युक्त विमान चेन्नई आणि बेंगळूर दरम्यान उडाले.✓ योग्य
  • )भारताने नुकतेच आपले जैव इंधन 2018 चे राष्ट्रीय धोरण जाहिर केले आहे.
  • )या धोरणानुसार 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Polity

खालील विधाने विचारात घ्या : अ. भारतातील कोणत्याही राज्याचे ‘विशेष दर्जा असलेले राज्य’ (Special Category Status State) असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही. ब. राष्ट्रीय विकास परिषदेने सर्वप्रथम 1969 साली जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि नागालँड या राज्यांना विशेष दर्जा असलेली राज्ये म्हणून मंजुरी दिली होती. क. केंद्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणाऱ्या निधी पैकी 90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या राज्यांना केंद्र शासनाकडून दिला जातो तर सामान्य वर्गातील राज्यांच्या बाबतीत हाच निधी 60% असतो. वरीलपैकी कोणते विधान/ने चुकीचे/ची आहे/त ?

  • )फक्त अ
  • )अ आणि ब
  • )फक्त क
  • )वरीलपैकी एकही नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/rajyaseva-2019-gs-paper-i