खालील विधाने विचारात घ्या: अ. सरपंचाचे (ज्याची निवड ग्राम पंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे) अथवा उपसरपंचाचे, रिक्त (राजीनाम्यामुळे) झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांका पासून तीस दिवसांच्या आत भरले पाहिजे. ब. थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांका पासून तीन महिन्यांच्या आत भरले पाहिजे. क. ग्राम पंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्राम पंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
- अ)फक्त अ✓ योग्य
- ब)फक्त अ आणि क
- क)फक्त ब आणि क
- ड)अ, ब आणि क
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →